महत्वाच्या बातम्या
-
सध्या विरोध करणाऱ्यांना दहशतवादी ठरविण्याची मोदी यांची नीती
एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हल्लाबोल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी आता जशास तसे प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून, मंगळवारी मुंबईत झालेल्या जाहीर सभेत त्यांनी त्याचे पुन्हा प्रत्यंतर दिले. ‘राजकारणात विरोधात जाणाऱ्या शक्तींना दहशतवादी ठरविण्याची मोदी यांची नीती आहे’, असा थेट आरोप पवार यांनी केलाच पण, नेहरू, गांधी कुटुंबांनी देशासाठी काय केले, असा प्रश्न करणाऱ्या मोदींना या कुटुंबांनी केलेल्या कार्याची जंत्रीच वाचून दाखवली.
5 वर्षांपूर्वी -
ईशान्य मुंबई: जोरदार शक्तिप्रदर्शन करत संजय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
किरीट सोमैया आणि शिवसेनेच्या वादात ईशान्य लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर गैरव्यवहाराचे वैयक्तिक आरोप केल्याने किरीट सोमैया यांचा पत्ता कट करत भाजपाने मुलुंडचे नगरसेवक मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने माजी खासदार संजय दीना पाटील यांना आधीच उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी प्रचारात देखील आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले.
5 वर्षांपूर्वी -
गांधी घराण्याची गरीबी हटली; लोकांची नाही: उद्धव ठाकरे
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी गरीबी हटावची घोषणा करताहेत. खरंतर याआधी त्यांच्या आजीबाईंनी याची सुरूवात केली होती. त्यांची गरीबी हटली, परंतु लोकांची नाही. काँग्रेस देशद्रोहाचे कलम हटवू पाहत आहे. हाच सर्वात मोठा देशद्रोह आहे. हे कलम काढल्यास दाऊद येऊन काँग्रेसचा नेता बनेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
5 वर्षांपूर्वी -
भाजप युवा मोर्च्याच्या वतीने भव्य युवा-महोत्सव २०१९ साजरा, अनेक मान्यवरांची उपस्थिती
अंधेरी पूर्व येथे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने भव्य युवा महोत्सव २०१९ साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई विभागातील अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान, या युवा महोत्सवाचे आयोजन एस. के. बंजारा फाउंडेशन आणि अजिंक्य युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले होते.
5 वर्षांपूर्वी -
अध्यक्ष महोदय! तुम्ही तर DJP पार्टीवाले, 'दुसऱ्यांची जाळ्यात पकडा'
काल एका सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष करताना, लोकसभा निवडणूक न लढवण्याचा मनसेच्या निर्णयावर मनसेचा उल्लेख ‘उनसे’ म्हणजे ‘उमेदवार नसलेला पक्ष’ असा केला आहे. त्यावरून महाराष्ट्र सैनिकांनी देखील देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच लक्ष केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
बार प्रकरणी: वरिष्ठ पोलिसांच्या मलईसाठी कनिष्ठ पोलिसांचा बळी?
अंधेरी पूर्व येथील सरोज बारमध्ये सिंगरमहिला अश्लील हाव भाव करत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपाखाली अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यक्रात असलेल्या पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपायावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलात वरिष्टांबद्दल असंतोषाचे वातावरण पसरलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सत्ताकाळात शिवसेना-भाजप खासदारांची संपत्ती ६० टक्क्यांनी वाढली
भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांच्या संपत्तीमध्ये तब्बल १०६ टक्क्यांची घट झाल्याची आकडेवारी समोर आली होती. पण, आता शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये तब्बल ६० टक्क्यांची वाढ झाल्याचे समजते. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवीत असलेल्या शिवसेना-भाजप खासदारांच्या संपत्तीमध्ये सरासरी ३.२० कोटींची वाढ झाली आहे. ADRच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. २०१४ आणि २०१९ मधील आकड्यांची तुलना केल्यानंतर ही आकडेवारी देण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
अभिजित भुर्के यांचा 'राजकारणाच्या फडा'वरून थेट 'मनसे' राजकारणात प्रवेश
आज मुंबईमध्ये मनसेचा शिवतीर्थावर भव्य गुढीपाडवा मेळावा पार पडला. तुफान गर्दी उसळलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी अनेकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. सध्या समाज माध्यमांच्या आधारे देखील सुशिक्षित तरुणांना मनसे सारख्या आक्रमक आणि रस्त्यावरील लढाई लढणाऱ्या पक्षात प्रवेश करावासा वाटत आहे, ही पक्षासाठी जमेची बाजू आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे ‘राजकारणाचा फड’ या फेसबुक ग्रुपचे मॉडरेटर अभिजित भुर्के यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.
5 वर्षांपूर्वी -
बीडमध्ये राष्ट्रवादीला धक्का जयदत्त क्षीरसागर मातोश्रीवर
बीडमधील एनसीपीचे नाराज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत त्यांचे बंधु भारतभूषण क्षीरसागर देखील स्वतः उपस्थित होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान एनसीपीला मोठा राजकीय धक्का बसल्याच म्हटलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
उत्तर मुंबई उमेदवार उर्मिला मातोंडकर विरोधात भाजपाची पोलिसात तक्रार
काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करणाऱ्या आणि उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उमेदवार म्हणून उतरलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदींकडून हिटलरची कॉपी, राज ठाकरेंचा घणाघात
नरेंद्र मोदी हे एडॉल्फ हिटलरची कॉपी करत आहेत असा घणाघात राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत केला. तसेच जर त्यांच्याविरोधात तोंड उघडलं की देशद्रोही ठरवून मोकळं व्हायचं ही हिटलरचीच मूळ संकल्पना आहे याची त्यांनी उपस्थितांना आठवण करून दिली. त्याचाच कित्ता सध्या नरेंद्र मोदी गिरवत आहे असा स्पष्ट आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच २०१४ देशाला दाखवलेली ‘अच्छे दिन’ ही मूळ संकल्पना अमेरिकेतील रूझवेल्ट यांच्या वडिलांची आहे ज्यांनी “Happy Days will come” असा नारा त्यावेळी दिला होता. आता नरेंद्र मोदींनी नेमकी त्यांचीच कॉपी केली आहे, असा आरोप राज ठाकरेंनी भर सभेत केला.
5 वर्षांपूर्वी -
आज मोदींची नांदेडमध्ये तर राज ठाकरेंची मुंबईत सभा
आज गुढीपाडव्याचा मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर तोफ धडाडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे प्रत्यक्ष निवडणुकीत न उतरता आघाडीला मदत करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभूत करण्यासाठी रणशिंग फुंकणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील नांदेडमध्ये सभा असून भाजप देखील कामाला लागली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंना मोदींच्या मुद्यावरून विचलित करण्याची राज्यातील नेत्यांची रणनीती?
मागील काही महिन्यापासून राज ठाकरे यांनी केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशपातळीवरील नेत्यांना लक्ष करण्याचं एकमेव ध्येय ठेवलं आहे. त्यात ते अनेक व्हिडिओ पुरावे दाखवून मोदींना लक्ष करत असल्याने मोदींच्या अडचणीत वाढताना दिसत आहेत. त्याचा थेट परिणाम राज्यातील नेत्यांवर देखील होताना दिसत आहे. त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना बारामतीचा पोपट असा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढे कार्यकर्त्यांना म्हणाले की त्यांच्या भाषणाने तुम्ही विचलित होऊ नका.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत SRA अंतर्गत ५०० चौरस फुटांचे घर देणार: काँग्रेस
मुंबईत सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे गृहनिर्माणचा आणि फोफावत जाणारे लोंढे तसेच त्याच्या घरांचा. काँग्रेसचे सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेत येईल तेव्हा गृहनिर्माणचा प्रश्न आम्ही सर्वप्रथम मार्गी लावू त्यानुसार म्हाडा आणि एसआरए यांच्याद्वारे गृहनिर्माण प्रकल्प साकारत नागरिकांना किमान ५०० चौरस फुटांचे घर असावे, अशी आमची योजना आहे, असे काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ? अर्थात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दीना पाटील यांना?
ईशान्य मुंबईतील उमेदवारी कुणाला द्यायची यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यावरून मोठं वादंग निर्माण झालं. खासदार किरिट सोमय्या यांचा पत्ता कट करण्यात शिवसेनेला यश देखील आले आहे. पण शिवसेनेने केलेल्या रडीच्या खेळामुळे ईशान्य मुंबईमध्ये युतीने स्वतःचेच हसू करून घेतले आहे. मात्र त्याचा फायदा एनसीपीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना होऊ शकतो, असे चित्र सध्या या मतदारसंघात निर्माण झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पालकांसाठी बुरे दिन! यावर्षी स्कूल बसचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढणार
स्कूल बस मालक संघटनेने वाढलेल्या महागाईचे कारण पुढे करत स्कूल बसच्या दरात आगामी शैक्षणिक वर्षापासून दहा ते पंधरा टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी मालक संघटनेने जाहीर केलेल्या धोरणातून ही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की, डिझेलसह बसचा विमा, कर्मचाऱ्यांचे वेतन, बसचा देखभाल खर्च वाढला आहे असं स्पष्ट केलं. याशिवाय मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बस मालकांच्या खर्चात वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने सुरक्षेच्या नावाखाली आणलेल्या नव्या नियमावलीमुळेही बस मालकांचे बजेट कोलमडले आहे. परिणामी, २०१९-२० या येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बससाठी दहा ते पंधरा टक्के दरवाढ केली जाईल.
5 वर्षांपूर्वी -
ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी, सोमय्यांचा पत्ता कट की दुसरी सेटलमेंट?
शिवसेना-भारतीय जनता पक्षाचं जागावाटप निश्चित झालं असतानाही ईशान्य मुंबईतून भाजपकडून नक्की कोणाला उमेदवारी द्यायची यावर अजूनही निर्णय झाला नव्हता. त्यात किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला होता, त्यानंतर आता भाजपाकडून ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना पक्ष अल्पसंख्याकांविरोधात आहे: मिलिंद देवरा
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असताना मुंबई काँग्रेसने देखील सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना अल्पसंख्याकांविरोधात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. काही वर्षांपूर्वीच शिवसेनेने जैन मंदिराबाहेर मांस शिजवून जैन समाजाचा अपमान केला होता याची आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली. आता मतदानातून त्यांना चांगलाच धडा शिकवा, असे जाहीर आवाहन देवरा यांनी जैन समाजाला केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
ते भगवं-पांढरं राहू दे! उद्धव ठाकरेंनी सेनेच्या डझनभर मंत्र्यांच्या कामाचा हिशेब द्यावा: समाज माध्यमं
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात वायफळ मुद्यांना विशेष महत्व देत असून, त्याच मुख्य कारण म्हणजे शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांनी केलेला विकास शून्य कारभार आणि राजीनामा नाट्याचे प्रयोग याशिवाय दुसरं काहीच केलं नसल्याने, शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्या डझनभर मंत्र्यांच्या ५ वर्षातील कारभाराचा हिशेब सामान्य जनतेला द्यावा असे आवाहन समाज माध्यमं करताना दिसत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत तब्बल २८ कंपन्यांमध्ये भागीदारी - नारायण राणे
कोकणात देखील लोकसभेची धामधूम सुरु झाली आहे असंच म्हणावं लागेल. मुंबईत मराठी माणसांची टक्केवारी कमी झाली, १९६०-६६ दरम्यान मुंबईत मराठी माणूस साठ टक्के होता, पण आज मराठी माणूस केवळ १८ टक्के शिल्लक आहे. मुंबईतला मराठी माणूस कुठे गेला.वसई, बदलापूर, कल्याण याठिकाणी मराठी माणूस निघून गेले. ही स्थिती शिवसेनेनी आणली, उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत पार्टनरशिप आहे. २८ कंपन्यांमध्ये रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची भागीदारी आहे. हे मी विधानसभेत पुराव्यानिशी मांडले, सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा स्पष्ट आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
- RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर?
- IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
- Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी
- Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या