महत्वाच्या बातम्या
-
एक्झिट पोलनंतर विवेक'बुद्धी' हरवली; फ्लॉप कलाकार विवेक ओबेरॉयच वादग्रस्त ट्विट
बॉलीवूडमध्ये सध्या संधी नसलेले अनेक कलाकार भाजप प्रेमी झाले आहेत. त्यानंतर त्यांचे वादग्रस्त प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. तसाच काहीसा प्रकार अभिनेता विवेक ओबेरॉय याने एक्झिट पोलवरून रंगलेल्या चर्चेवरून केला आहे. वास्तविक एक्झिट पोलबाबत काही मत व्यक्त करण्यास काहीस हरकत नव्हती. मात्र सध्या विवाहित असलेल्या ऐश्वर्या राय संदर्भात समाज माध्यमांवरील फिरणाऱ्या विचित्र गोष्टी शेअर करून त्याचा संदर्भ सध्याच्या एक्झिट पोलशी जोडणे म्हणजे निव्वळ स्वतःची विवेक’बुद्धी’ हरवल्याची प्रकार आहे असंच म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
२०१४ वगळता यापूर्वी एक्झिट पोल खोटी ठरली व भलतेच निकाल आल्याचा इतिहास
काल लोकसभा निवडणुकीच्या ७व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपताच अनेक टीव्ही वृत्तवाहिन्यांची विविध एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलची निरीक्षणं प्रसिद्ध केली आहेत. वास्तविक २३ तारखेला खरं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान प्रसार माध्यमांमध्ये एक्झिट पोलची दिली जाणारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष निकालाचे चित्र पूर्णपणे वेगळंही असू शकतं असा पूर्व इतिहास देखील आहे. एक्झिट पोलचे अंदाज सपशेल आपटल्याची अनेक उदाहरणे आहेत. २००९ मधील एक्झिट पोलची आकडेवारी त्याच उत्तम उदाहरण ठरले आहेत. त्याव्येतिरिक्त ही अनेकदा निरनिराळ्या एजन्सीने केलेली एक्झिट पोल खोटी ठरली असल्याचे इतिहास आहे.
5 वर्षांपूर्वी -
एक्झिट पोलच्या अंदाजानंतर शेअर बाजार उसळला
लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल काल सर्वच वृत्तवाहिन्यांनी जाहीर केल्यानंतर आज शेअर बाजाराने मोठी उसळी मारल्याचे समजते. आज सकाळी शेअर बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थात सेन्सेक्स तब्बल ९०० अंकांनी वधारला. तर निफ्टी देखील ११,६४८ अंकांवर पोहोचला. यासह रूपया देखील ७३ पैशांनी मजबूत झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
बहुमत मिळणार नसल्याने मोदी लवकरच सरसंघचालकांची भेट घेणार; नागपूर लॉबी सक्रिय?
लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या २ दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्यार असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमधील संघाच्या मुख्यालयात जाऊन विविध मुद्द्यावर सरसंघचालकांशी चर्चा करणार असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहेत आणि त्यामुळे २ दिवसांपूर्वी होणाऱ्या या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
EVM मध्ये फेरफार करण्यासाठी Exit Polls चा होतोय वापर: ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलवरुन ईव्हिएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मोठी शंका उपस्थित केली आहे. ‘एक्झिट पोलवर माझ्या विश्वास नाही, कारण अशा रणनितीचा वापर फक्त ईव्हिएममध्ये घोटाळा करण्यासाठी केला जातो’, असे ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
७व्या टप्प्यातील मतदान पूर्ण; थोड्याच वेळात जाहीर होणार एक्झिट पोल
लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या आणि ७व्या टप्प्यातील मतदान संध्याकाळी ६ वाजता अधिकृतपणे पूर्ण झाले असून संध्याकाळी ६:३० वाजता एक्झिट पोलचा अंदाज जाहीर होणार आहे. २३ मे रोजीच्या मतमोजणीपूर्वी एक्झिट पोलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
५०० रुपये देऊन भाजपने बोटावर बळजबरी शाई लावली व मतदान करु नये सांगितलं
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजे ७व्या टप्प्यातील मतदानासाठी मतदारांकडून आज सकाळपासून सुरूवात झाली आहे. परंतु, युपीच्या चंदौली लोकसभा क्षेत्रातून एक अतिशय धक्कादायक वृत्त आहे. येथे मतदानाच्या एक दिवस आधीच मतदारांच्या बोटावर जबरदस्तीने शाई लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
केदारनाथला ध्यानसाधनेवेळी फोटोग्राफर व कॅमेरामन? ऐसा पंतप्रधान पुन्हा होणे नाही!
नरेंद्र मोदी कालच्या पत्रकार परिषदेवरून झालेल्या टीकेतून बाहेर येत नाहीत तो पर्यंत त्यांच्यावर पुन्हा जोरदार टीका करण्यात येत आहे. कारण केदारनाथ मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी दर्शन घेत ध्यानसाधना सुद्धा केली. त्यांच्या या ध्यानसाधनेची समाज माध्यमांमध्ये जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
आजवर मोदी व शहांनी दादागिरीच केली, मग ममतांनी केली तर बिघडले कुठे? राज ठाकरे
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे करत आहेत ते योग्यच आहे. मात्र आजवर या दोघांनी म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी इतरांसोबत दादागिरीच केली आहे. मग ममतांनी केली तर त्यात बिघडले कुठे? अमित शाहांना कळू दे दादागिरी काय असते ते. कोलकात्यातील रॅली अर्धी सोडून अमित शहा पळून आले. यांच्या बाबतीत हेच पाहिजे होते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
चंद्राबाबू-शरद पवार भेट! दीड तास चर्चा
लोकसभा निवडणुकीच्या ७व्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या मतदान पार पडणार आहे. यादरम्यान नवं सरकार बनविण्याच्या दृष्टीने विरोधकांच्या जोरदार हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी’चे सर्वेसेवा चंदबाबू नायडू यांनी आज राजधानी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.
5 वर्षांपूर्वी -
वर्ल्ड कपचं थीम सॉंग ऐकलंत?
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा येत्या ३० मेपासून सुरू होत आहे. त्यामुळे सध्या जगभरात क्रिकेटची जादू दिसत आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंप्रमाणेच चाहत्यांमध्येही प्रचंड उत्साह दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC)ने शुक्रवारी समाज माध्यमांवरून वर्ल्ड कपचं थीम सॉंग शेअर केलं आहे. ‘Stand By’ असे या गाण्याचे बोल असून Rudimental या बँडने हे गाणं गायलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
चुनावी जुमला! मतदान जवळपास संपण्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यातील २,००० रुपये परत घेतले?
लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून केवळ ७व्या टप्प्याचे मतदान उरले आहे. मात्र त्यानंतर हळुवारपणे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेले २,००० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यातून काढून घेण्यात आल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडू लागले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संताप पसरला आहे.
5 वर्षांपूर्वी -
परीक्षा आली! 'देवा मला पास कर' तशी 'त्यांची' आजची अवस्था?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथाचं दर्शन घेतलं आणि त्याचे थेट प्रक्षेपण देशभरातील वृत्त वाहिन्यांवर होईल याची देखील दक्षता घेतल्याचे पाहायला मिळाले. मोदींनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विशेष पूजा केली. यानंतर मोदी केदारनाथमध्ये ध्यान करणार आहेत. मोदींचा उत्तराखंड दौरा दोन दिवसांचा आहे. यानंतर ते सोमवारी (१९ मे) बद्रिनाथला जातील.
5 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदींच्या पहिल्या पत्रकार परिषदेत ‘मौन की बात’! राज ठाकरेंचं ट्विट
नरेंद्र मोदींनी काल पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. परंतु त्यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. मोदींना विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी उत्तरं दिली. यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह सर्वच विरोधकांनी मोदींवर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे. आमच्या देशाचा पंतप्रधान पत्रकारांना सामोरा जायला घाबरतो, अशी टीका महिन्याभरापूर्वी करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मोदींवर नेमक्या शब्दांत शरसंधान साधलं.
5 वर्षांपूर्वी -
प्रचारात 'ये मोदी हैं, जवाब जरूर देगा' आणि पत्रकारपरिषदेत 'अध्यक्षजी जवाब देंगे'!
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपताना दिल्लीत आज भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद झाली. दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदींनी प्रसार माध्यमांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही. या पत्रकार परिषदेत मोदींसोबत अमित शहा आणि इतर नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र जर पत्रकार परिषदेत मोदींना प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरच द्यायची नव्हती तर त्यांनी येथे हजेरी तरी का लावली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांना जी धमक वाघिणीने दाखवली, ती धमक वाघ हयातीत दाखवणार नाही?
सध्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराअंती पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले असले तरी, ममता बॅनर्जींच्या बेधडकपणाची चर्चा देशभर रंगली आहे. अमित शहांच्या प्रचार रॅलीनंतर पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. संपूर्ण भाजपने पश्चिम बंगालमधील वातावरण शेवटच्या टप्प्यात दूषित करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न केला जो ममता बॅनर्जी यांनी धर्याने परतवून लावला.
5 वर्षांपूर्वी -
एनडीए सरकार जाणं महत्वाचं; पंतप्रधान इतर पक्षाचा होण्यास आमची हरकत नाही: काँग्रेस
लोकसभा निवडणुकीच्या ७व्या टप्प्यातील प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाने निवडणुकीनंतरची आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर पुढील सरकारचे नेतृत्व काँग्रेस करेल. परंतु युपीएच्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसच्या बाजूने सहमती नसेल तर दुसऱ्या कोणत्या पक्षाचा पंतप्रधान बनू देणार नाही, अशी भूमिका काँग्रेस घेणार नसल्याचं यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
प.बंगालमधील घटनाक्रम हा ममतांना लक्ष करण्यासाठीच: मायावती
पश्चिम बंगालमध्ये काल घडलेला प्रकार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लोकसभा निवडणुकीत लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला होता हे स्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीचा असा प्रचार धोकादायक आणि फार अन्यायकारक आहे. अशाप्रकारचं राजकारण पंतप्रधानपदाला न शोभणारं असल्याचा आरोप बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी, शहांना निवडणूक आयोग शरण: काँग्रेसचा थेट आरोप
कोलकाता येथे मंगळवारी अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी आणि जाळपोळ झाली. दरम्यान, या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने घेतलेल्या एकतर्फी भूमिकेवरून काँग्रेसने मुख्य निवडणूक आयोगावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर अक्षरशः शरणागती पत्करली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारावर एक दिवस आधीच बंदी घालण्याचा निर्णय हा पूर्णपणे घटनाविरोधीत आहे, अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोलकात्यातील घटनेला पश्चिम बंगाल सरकार जबाबदार: संजय राऊत
पश्चिम बंगालमध्ये उद्भवलेली परिस्थिती लोकशाहीसाठी दुर्दैव घटना असून कोलकात्यातील या घटनेला पश्चिम बंगालमधील ममता दीदींचे सरकार जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राड्यावर सविस्तर भाष्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?