महत्वाच्या बातम्या
-
भाजपच्या कर्जबुडव्या नेत्यांची जाहिरात सार्वजनिक बँकां स्वतःच वर्तमानपत्रात देत आहेत
देशभर निरव मोदी आणि अनेक कर्जबुडव्या उद्योगपतींचे घोटाळे समोर असताना लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच भाजपच्या नेत्यांची पोलखोल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच भाजपच्या कर्जबुडव्या नेत्यांची घोषणा थेट वर्तमानपत्रातून जाहिरात देऊन करत आहे. त्यामुळे राज्यातील भाजपचे नेते आणि त्यांची कृत्य सामान्यांसमोर उघड होत आहेत असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
गुजराती नेते महाराष्ट्र घोटाळ्याने पोखरत आहेत; SRA व एस.डी.कॉपोरेशन प्रकरण काय आहे?
सध्या राज्यात अनेक घोटाळे बाहेर येत असून, त्यात राज्यातील अमराठी नेते महाराष्ट्र घोटाळ्यांनी पोखरत असल्याचं उघड होत आहे. भाजपच्या या गुजराती नेत्यांचे देशातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांशी घनिष्ट संबंध असून, त्यांच्यासाठी कायदे धाब्यावर बसवून बांधकामं केली जात आहेत. त्यामध्ये एस. डी. कॉर्पोरेशन या बांधकाम कंपनीचं नाव सर्वात पुढे आहे. कांदिवली पूर्वेतील ठाकूर व्हिलेज येथे म्हाडाच्या अखत्यारीत येणाऱ्या ५२ एकर जागेवर सुरु असलेला तब्बल १२ हजार कोटींचा प्रकल्प ते ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात, त्याच विकासकासाठी याच गुजराती नेत्यांनी अक्षरशः नियम धाब्यावर बसवून स्वतःच्या तुंबड्या भरल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
दूध महागलं! निवडणुकीत 'चाय पे चर्चा' संपताच सरकारने प्रति लिटर 3 रू अनुदान बंद केले
लोकसभा निवडणूक संपताच आणि केंद्रात बहुमताने मोदी सरकार पुन्हा विराजमान होताच, महागाईत आता पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. खाजगी आणि सहकारी दूध महासंघाची महत्वाची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीत गायीच्या दुधाच्या दरात २ रूपयांची वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दुधाचे नवे दर ८ जूनपासून लागू करण्यात येणार आहे. सध्या गायीच्या दुधाचा दर ४२ रूपये प्रति लिटर असून तो आता ४४ रूपये प्रति लिटर होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात पाणीबाणी! धरणांमध्ये केवळ ७.७ टक्के पाणीसाठाच शिल्लक
महाराष्ट्रात भीषण पाणीसंकट ओढावलं आहे. मान्सून येत्या २ दिवसांत केरळमध्ये दाखल होणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी लागण्यास अद्याप वेळ आहे. अशातच राज्यातील धरणांमध्ये केवळ ७.७ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने महाराष्ट्राला येत्या काळात मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची बाब समोर आली आहे. मागील वर्षी यावेळी राज्यातील धरणांमध्ये १८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता तर मराठवाड्यात १४ टक्के पाणीसाठा होता परंतु या वर्षी मराठवाड्यात केवळ ०.७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.
6 वर्षांपूर्वी -
डॉ. पायल तडवी आत्महत्या: तिन्ही डॉक्टर आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी
नायर रुग्णालयाच्या एमबीबीएस डॉक्टर पायल तडवीच्या आत्महत्या प्रकरणाने आता संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. डॉ. पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा आहुजा यांना कोर्टाने ३१ मेपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. त्यांची ही शिक्षा वाढविण्यात आली असून १० जूनपर्यंत त्यांना कोर्टाच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे. तसेच हे आत्महत्येचेच प्रकरण असून ही हत्या नसल्याचे कोर्टाने आधीच स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे शाखेकडे सोपविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्रीदेखील आहेत.
6 वर्षांपूर्वी -
त्र्यंबकेश्वर: जलयुक्त शिवार योजना निष्प्रभ, गावं जलमुक्त होण्याच्या मार्गावर
तालुक्यात मागील ४ वर्षांत जलयुक्त शिवारची कामे झाली, परंतु आज तालुकाच जलमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. भूजल पातळी खोल गेली असून, गेल्या वर्षापेक्षा यावर्षी आणखी ७० ते ८० फुटांनी पाणी खाली गेले आहे. तालुक्यातील विहिरींनी कधीच तळ गाठला असून, आता हातपंपदेखील हतबल झालेले दिसत आहेत. तालुक्यात आठ शासकीय टँकर ३२ वस्त्यांना पाणीपुरवठा करीत आहेत. याशिवाय सामाजिक संस्थादेखील पाणीपुरवठा करीत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: पुनाळेकर, भावेने पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यास केली मदत
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात शनिवारी अटक करण्यात आलेले ‘सनातन’चे वकील संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहकारी विक्रम भावे या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एन. सोनवणे यांनी १ जूनपर्यंत CBI कोठडी सुनावली आहे. दरम्यान हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यास पुनाळेकरने मदत केली, तर भावे याने दाभोलकरांच्या घराची रेकी केली, असा सीबीआयचा आरोप आहे.
6 वर्षांपूर्वी -
वैद्यकीय प्रवेश: खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची आज राजभवनासमोर निदर्शने
राज्यात मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा तिढा सुटण्याची काहीच चिन्हं दिसत नाहीत. दरम्यान पदवीधर मेडिकल प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढल्यानंतर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. राज्यपालांनी राज्य सरकारच्या अध्यादेशावर अध्यादेशावर स्वाक्षरी करू नये यासाठी मराठा विद्यार्थी आणि पालक राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
लातूरमध्ये दुष्काळामुळे गावकऱ्यांवर शरिराला हानिकारक पाणी पिण्याची वेळ
मराठवाड्यात दुष्काळाने अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येते आहे. त्यात लातूरमध्ये परिस्थिती अत्यंत भीषण असल्याचं वृत्त आहे. पिण्याच्या पाण्याचा अनेक गावांमध्ये तुटवडा जाणवत असल्याने अनेक गावातील महिलांची वणवण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी शरीराला अपायकारक असलं तरी ते अशुद्ध पाणी पिण्याची वेळ अनेकांवर आल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
भर पावसाच्या काळात सर्वच पक्ष विधानसभेच्या तयारीला लागणार
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तोफा थंडावल्या आणि मतदान देखील पार पडलं आहे. दरम्यान, देशातील आता शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया येत्या दोन दिवसात संपेल आणि प्रतीक्षा असेल ती २३ तारखेला लागणाऱ्या लोकसभा निकालाची. मात्र लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लगेचच १०-१२ दिवसांनी पावसाळा सुरु होणार आहे. साधारण ४ महिन्यांचा पावसाळ्याचा सीझन संपताच साधारणपणे ऑक्टोबरच्या आसपास राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
बिंग फुटलं? राज्यात भाजपच्या मदतीसाठीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना: प्रवक्ते मिलिंद पखाले
भारतीय जनता पक्षाला निवडून आणण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना, करण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मिलिंद पखाले यांनी केला असून पूर्व विदर्भातील पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या भारिप’ला सोडचिट्ठी देत असल्याचे जाहीर केले.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण: निवडणुकीपूर्वी लाडू भरवणारे हेच ते नेते वैद्यकीय प्रवेश गोंधळानंतर गायब
निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणावर मार्केटिंग करून श्रेय घेणारे आणि एकमेकांना केमेऱ्यासमोर लाडू भरवत स्वतःची पाठ थोपटून घेणारे हे भाजप आणि शिवसेनेचे मंत्री आणि आमदार सध्या मराठा समाजातील मुलांच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेपासून लांब आहेत. सध्या मराठा समाजातील विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत प्रचंड अडचणींचा सामना करत आहेत आणि सत्ताधाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली आहे. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा कायदेशीर आणि प्रशासकीय अडसर दूर झाला. पुढील तीन दिवसांत अजोय मेहता अधिकृतपणे पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. येत्या सप्टेंबरमध्ये अजोय मेहता निवृत्त होणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
#सेव-फार्मर्स-फ्रॉम-फडणवीस : शेतक-यांसाठी नेटकरी मुख्यमंत्र्यांविरोधात एकवटले
दुष्काळाने महाराष्ट्र होरपळून निघत आहे, हंडाभर पाण्यासाठी गावकरी जीवाचे रान करत आहेत, अशा परिस्थितीसमोर हतबल होऊन अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. दरम्यान, महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात सर्वाधीक शेतक-यांनी आत्महत्या केल्या असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी व्हावी तसेच शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी नेटकरी एकवटले असून समाज माध्यमांवर SaveFarmersFromFadnavis ही हॅशटॅग मोहिम राबवण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
दुष्काळी उपाययोजनांसाठी निवडणूक आयोगाकडून आचारसंहीता शिथिल
महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती. सदर मागणी निवडणूक आयोगाने विषयाचे गांभीर्य लक्षात मान्य केली आहे. दुष्काळी उपाययोजनांसाठी महाराष्ट्रातील आचारसंहीता शिथील करण्यात आली असल्याचे निवडणूक आयोगाने आज दुपारी जाहिर केले.
6 वर्षांपूर्वी -
शेलारांना माहीत नसावं, भाजपचे प्रवक्ते वेरिफाइड अकाऊंटवरून असे फेक व्हिडिओ शेअर करतात
मुंबई : आज मुंबईमध्ये आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या व्हीडीओ आरोपांना प्रतिउत्तर देण्यासाठी जे काही दाखवलं त्यातील अनेक गोष्टी या हास्यास्पद होत्या. मुळात वेरिफाइड अकाउंट कोणाला मिळत याचे फेसबुक व ट्विटरने काही नियम आखले आहेत आणि अकाउंट वेरिफाइड करण्यासाठी संबंधिताला पुरावे देखील द्यावे लागतात. मुळात सामान्य वापरकर्त्याला फेसबुक किंवा ट्विटर अकाउंट वेरीफाईड करता येत नाही. अगदी अनेक पत्रकार, समाज सेवक आणि सामाजिक संस्था देखील आज अन वेरिफाइड अकाउंट वापरतात. त्यात मागील वर्षभरापासून फेसबुक व ट्विटरने भारतात अकाउंट वेरीफाईड करण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज राज ठाकरेंची तोफ नाशकात धडाडणार, दत्तक नाशिकची पोलखोल होणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नाशिक शहरात जाहीर सभा होत आहे. शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर सभा होणार असून राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर दुसर्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची सभा होत असल्याने राज ठाकरे जहरी शब्दात टीका करतात की, नरमाईची भूमिका घेतात याविषयीची उलट-सुलट चर्चा शहरात सुरू आहे.
6 वर्षांपूर्वी -
अल्बम मध्ये नाचणा-यांनी मला सांगू नये; राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरुन एकमेकांची खिल्ली उडवण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार न उभे करता मोदींना आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात प्रचाराचं जोरदार रणशिंग फुंकलं आहे. त्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर बोचऱ्या भाषेत टीका करताना बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणून राज यांची खिल्ली उडवली होती. परंतु फडणवीसांच्या या टीकेची राज ठाकरे यांनी त्याहीपेक्षा बोचरी टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
२३ तारखेला कोणाच्या चड्डी उतरतील ते समजणार आहे; पवारांना मुख्यमंत्र्यांचा टोला
पराभव समोर दिसत असल्यामुळेच एनसीपीचे अध्यक्ष शरद पवारांचा तोल सुटत चालला आहे. शरद पवार म्हणाले होते, भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यामुळे आता चड्या घालून मांड्या दाखवू नका. पण, इथे तर फुल पॅन्ट आहे. तुम्हीच या चड्डीवाल्यांच्या सपोर्टवर मुख्यमंत्री झाला होता, हे मात्र विसरू नका. कारण, येथे २३ तारखेला कोणाच्या चड्डी उतरतील ते समजणार आहे, असे टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.
6 वर्षांपूर्वी -
हे काय? चक्क कट्टर हिंदुत्ववादी व एमआयएम एकाच खोलीत, स्क्रिप्ट देताना?
सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर सभा घेत भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शहांविरोधात जोरदार प्रचार सुरु केला आहे. संपूर्ण प्रचारात व्हिडिओ पुराव्यानिशी नरेंद्र मोदी आणि अमित शहांची पोलखोल होत असल्याने भाजपचे नेते देखील राज ठाकरे यांना वेगवेगळ्या मार्गाने लक्ष करत आहेत. त्यात राज ठाकरे हे बारामतीच्या काकांच्या सांगण्यावरून सर्वकाही करत आहेत आणि त्यांची स्क्रिप्ट बारामतीवरून येते असा खोचक टोला देखील लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL